अमृतसर : जर सरकारने शिखांसाठी स्वतंत्र राज्य दिले तर समाज ते स्वीकारेल, असे मत व्यक्त करून अकाल तख्तचे जथ्थेदार ग्यानी हरप्रितसिंग यांनी खलीस्तानचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या 36 व्या वर्षपुर्तीनिमित्त हरप्रितसिंग पत्रकारांशी बोलत होते. तुम्ही खलिस्तानच्या मागणीचे समर्थन करता का? असे विचारता ते म्हणाले, जर आम्हाला ते मिळाले, तर आम्हाला आणखी काय हवे. जर भारत सरकारने आम्हाला तसा प्रस्ताव दिला तर समाज तो स्वीकारेल. जगातील कोणत्या शिख धर्मियाला ते नको असेल?
शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गोविंदसिंह लोंगोवाल म्हणाले, जर समाजाला खलिस्तान दिले तर शिखांकडून ते स्वीकारले जाईल. अकला तख्त येथे खलिस्तानच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांबाबत ते म्हणाले, त्यात काही वावगे नाही. धार्मिक समारंभ झाल्यानंतर या घोषणा देण्यात आल्या.