केवडिया – सरदार वल्लभभाई पटेल यांनी जगाला, भारताची एकता आणि अखंडता कोणीही नष्ट करू शकत नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेल आहे. सरदार पटेल यांची 182 मीटर उंचीची मुर्ती केवडिया येथे उभारण्यात आली आहे. तेथे अमित शहा यांनी आज सरदार पटेल यांच्या जयंती निमीत्त त्यांना आदरांजली वाहिली.
शहा म्हणाले की सरदार पटेल यांचे हे स्मारक हे आज राष्ट्रीय ऐक्य आणि देशभक्ती प्रेरणा स्थान बनले आहे. आज सरदार पटेल यांची जयंती संपुर्ण देशभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
त्यानिमीत्त दिलेल्या एका व्हिडिओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, सरदार पटेल यांच्या प्रेरणेमुळेच भारत स्वताचे स्वातंत्र्य स्वताच्या बळावर टिकवून ठेवत आहे.