मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या कमालीच्या उचांकी पातळीवर आहेत. त्याचबरोबर जागतीक शेअर बाजारातील वातावरण नकारात्मक असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच आहे. त्यामुळे बुधवारी निर्देशांकांत घट चालूच राहीली.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 254 अंकांनी कमी होऊन 59,413 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 37 अंकांनी म्हणजे 0.21 टक्क्यानी कमी होऊन 17,711 अंकांवर बंद झाला.
एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक या मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही. कोटक बॅंक, एशियन पेंन्टस्, अल्ट्रा टेक सिमेंट, टेक महिंद्रा या कंपन्यांनाही विक्रीचा मारा सहन करावा लागला. मात्र एनटीपीसी, पावर ग्रीड, सन फार्मा, स्टेट बॅंक, टायटन या कंपन्याच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली.
सकाळी निर्देशांकांची बरीच हाणी झाली होती. मात्र नंतर धातू, औषधी, सरकारी बॅंका या क्षेत्रानी काही प्रमाणात निर्देशांकाना आधार दिला. जागतीक बाजारातील नकारात्मक वातावणाबध्दल जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक व्ही के विजयकुमार यानी सांगितले की, अमेरीकेच्या कर्ज रोख्यावरील परतावा वाढत आहे.
त्यामुळे अमेरीकन शेअर बोजाराचे निर्देशांक कमी होते आहेत. त्याचा परिणाम जागतीक शेअर बाजारावर होत आहे. त्यामुळे आगामी काही काळ तरी गुंतवणूकदार सावध राहून नफा काढून घेण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.