-गणेश म. भा. फड
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या।।
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।।
असोनि संसारीं जिव्हे वागु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ।।
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरी ।।
संत ज्ञानेश्वर महाराज रचित हरिपाठातील हा पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊलींनी हरिपाठाचे अनुबंधचतुष्टय (अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध) सांगितले आहे.
पहिल्या चरणात ग्रंथाचा अधिकारी व प्रयोजन सांगितले आहे. जो देवाच्या दरवाज्यात उभा राहिला तो या ग्रंथाचा अधिकारी होय. या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे की, देवळाचा नव्हे तर देवाचा दरवाजा. द्वार हा शब्द साधन या अर्थाने आहे. म्हणजेच जो देवाच्या प्राप्तीचे साधन क्षणभर (जन्मभर) करतो त्याला चारीं मुक्तींचा लाभ होतो. चारी मुक्ती लाभ हे या ग्रंथाचे प्रयोजन.
क्रमश: