कराची : भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यासह आणखी एका देशाचा समावेश असेल, अशा चौरंगी क्रिकेट स्पर्धेच्या प्रस्तावावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयशी संवाद सुरू केला आहे. भारतानेच हा प्रस्ताव पुढे केला आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याव्दारे प्रस्तावित चौरंगी क्रिकेट स्पर्धेचा विचार अपयशी ठरणार अशी टीका पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफ याने केली आहे.
‘बिग थ्री (भारत, इंग्लंड व आॅस्ट्रेलिया) माॅडेल जसा फ्लाॅप ठरला, तसाच हा विचारही आपटल्याशिवाय राहणार नाही’, अशीही प्रतिक्रिया राशिदने दिली आहे.
२०२१ पासून क्रमाने तीन प्रमुख देशांच्या माध्यामातून या चौरंगी स्पर्धेचे यजमानपद भूषविले जाणार आहे. मात्र, तीनपेक्षा अधिक संघ असलेल्या स्पर्धांना आयसीसीने प्रोत्साहान दिलेले नाही.