औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या सभेत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सीटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गन्हा दाखल करण्यात आला आहे. 153, 116, 113, 135 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यासह राजीव जवळेकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झालाय. राज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यांनंतर शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून गुन्हा दाखल कऱण्याचं कारण सांगितलं.
शंभूराज देसाई म्हणाले की, राज ठाकरे यांच्या 1 मे रोजीच्या सभेला परवानगी देताना काही अटी शर्तींवर परवानगी देण्यात आली होती. या शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती गृहराज्यंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडीओ पाहिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या अटींचे पालन झाले नसेल त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असही शंभूराज देसाई यांनी सांगितले.
राज यांच्या सभेसाठी पोलिसांनी 16 अटी घालून दिल्या होत्या त्यापैकी 12 अटींचे त्यांच्या भाषणात उल्लंघन झाले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्य सरकारकडून अघोषित आणीबाणी सुरु आहे. राज ठाकरे हे स्वयंभू नेतृत्व आहेत. राज्य सरकार अहंकाराने भरलंय, असून राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करणं ही अतिरेकी कारवाई आहे. राज ठाकरेंना प्रतिसाद मिळत असल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचं दरेकर यांनी म्हटले आहे.