नवी दिल्ली – कोरोना महासाथीमुळे नीट परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. याबाबत सुनावणी करताना न्यायालयाने परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 14 ऑक्टोबरला परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश दिले.
ही परीक्षा तेच विद्यार्थी देऊ शकतील ज्यांना कोरोना संसर्गामुळे अथवा कंटेंटमेंट झोनमध्ये असल्याने 13 सप्टेंबरला झालेली परीक्षा देता आली नव्हती असं देखील न्यायालयाने स्पष्ट केले.
याबाबतची सुनावणी सुरू असताना महान्यायवादी तुषार मेहता यांनी या परीक्षांचे निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली. दरम्यान, शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी केलेल्या दाव्यानुसार 85 ते 90 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.