नवी दिल्ली – कृषी विधेयकविरोधात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकारवर होत असलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. पंतप्रधानांनी हमीभाव (MSP) होता, आहे आणि राहणार असल्याचा आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, लाल बहादूर शास्त्री यांनी ज्यावेळी कृषी सुधारणा केल्या. त्यांनाही मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही. तेव्हाही त्यांना अमेरिकेचे एजंट म्हणून डाव्या कॉंग्रेसने संबोधले होते. आज माझ्यावरही टीका केली जात आहे. कोणताही कायदा आल्यास काही वेळानंतर सुधारण होतात, असे त्यांनी म्हंटले आहे.
आंदोलनकर्त्यांना समजावून पुढे जायला हवे. टीका माझ्या खात्यात जाऊ द्या. पण सुधारणा होऊ द्या. वृद्ध नागरिकही आंदोलनाला बसले आहेत, त्यांनी घरी जावे. आंदोलन समाप्त करा आणि चर्चा पुढे चालू ठेवा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
तसेच, हमीभाव (MSP) होता, आहे आणि राहणार असल्याचा आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे. ज्या ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. त्यांनाही दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी दुसऱ्या पर्यायांवर विचार केला जात आहे, असे म्हणून मोदी म्हणाले आता अजून उशीर केला तर शेतकऱ्यांना अंधाराकडे ढकलले जाईल.
PM reitertes in Rajya Sabha ‘MSP tha, MSP hai aur MSP rahega.’
He is replying in the House to the Motion of Thanks on the President’s Address. pic.twitter.com/CsqDxJHBxO
— ANI (@ANI) February 8, 2021