मुंबई: भाजपने “आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे” जाहीर केल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आता शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे.
विधानसभेची मुदत संपूनही कुणीच सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने राज्यपाल कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. परंतु भाजपने सरकार स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांमधील घडामोडींना वेग आला आहे.
या तीनही पक्षांच्या स्वतंत्र बैठक झाल्या असून या मध्ये त्यांची रणनिरती आखली गेली असल्याचे बोलले जात आहे. जर शिवसेनेने भाजपशी नटे तोडले तरच आम्ही विचार करू अशी भूमिका आघाडीने घेतली आहे. त्यामुळे शिवसेना आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Office of Maharashtra Governor: Governor Bhagat Singh Koshyari today asked the leader of elected members of the second largest party, the Shiv Sena, Eknath Shinde to indicate the willingness and ability of his party to form the government in Maharashtra. pic.twitter.com/bdfKgHPj45
— ANI (@ANI) November 10, 2019
दरम्यान राज्यपालांनी शिवसेनेला अवघ्या २४ तासांची मुदत दिली असून उद्या सायंकाळ पर्यंत बहुमत सिद्ध कार्याचे असल्याने शिवसेनेला तातडीने निर्णय घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.