नवी दिल्ली – केंद्र सरकारने चार टप्प्यांमध्ये देशभर लॉकडाऊन करण्याचे धोरण आखले होते ते धोरण फसले आहे अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मोदींनी या लॉकडाऊन मधून जो अपेक्षित निष्कर्ष गृहीत धरला होता तो निष्कर्ष निघाला नाहीे.
आता चौथे लॉकडाऊन संपल्यानंतर सरकारचे एकूण काय धोरण आहे ते जनतेला स्पष्ट होणे गरजेचे आहे. हे सरकार स्थलांतरीत मुजरांना आणि गरीबांना कशा प्रकारे मदत करणार आहे तेही त्यांनी जाहींर करावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की देशात ही महामारी वेगाने पसरत आहे ती नियंत्रणात आणण्याचे सरकारकडे काय उपाय आहेत तेही सरकारने लोकांना सांगितले पाहिजे. लॉकडाऊन मुळे स्थिती नियंत्रणात येईल म्हणून हे लॉकडाऊन चार टप्प्यांपर्यंत वाढवण्यात आले. पण त्याचे अपेक्षित रिझल्ट मिळू शकलेले नाहीत.
सरकारचा त्या मागचे हेतू साध्य झालेला नाही अशी टीकाहीं त्यांनी केली. ही महामारी वेगाने पसरत असताना लॉकडाऊन शिथील करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे असे राहुल गांधी यांनी नमूद केले.