मुंबई – 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केलंय. तसच यावेळी त्यांनी हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य देखील केलं. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना आरपीआयचे ( खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी कंगनाचे समर्थन करणाऱ्या विक्रम गोखले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
खरात यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे. राज्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणाची आहुती दिली. भारत देश ना हिरव्याचा ना भगव्याचा आहे, ना एका रंगाचा आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाप्रमाणे या देशाचा अशोकचक्र असलेला तिरंगा झेंडा आहे. परंतु तुमच्या सारख्या बाजार बुनग्यांना या जन्मात तरी कळणार नाही अशा प्रतिक्रियाबरोबरच विक्रम गोखले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आरपीआयचे ( खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.