शिरूर : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार शासनाने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान केले आहेत. त्याबाबतचे परिपत्रक जारी झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे. या नियुक्तीच्या संदर्भात सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी शिरूर तालुक्यातील चंदन सोंडेकर यांनी केली आहे.
याबाबत चंदन सोंडेकर यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती करताना किमान त्या व्यक्तीला प्रशासकीय अनुभव असण्याची गरज आहे. त्याचबरोबर या जबाबदार संस्थेवर प्रशासक बसवताना पंधराव्या वित्त आयोगाच्या आर्थिक उलाढालीचा देखील विचार करून त्या ठिकाणी अनुभवी व्यक्ती निवडणे आवश्यक आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1270457026627333/
पालकमंत्र्यांच्या मार्जितली व्यक्ती प्रशासक होणार असेल तर त्यामुळे गावागावात राजकीय वाद उफाळून येऊ शकतात. त्यामुळे या नियुक्तीच्या संदर्भात सरकारने पुनर्विचार करावा आणि महिलांना पन्नास टक्के आरक्षण देऊन इतर घटकांचा देखील त्यात समावेश करावा अशी मागणी शिरूर तालुक्यातील चंदन सोंडेकर यांनी केली आहे.