नगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊन सुरु झाल्या पासून राज्यातील सर्व मंदिरे ही बंद करण्यात आली आहेत. या करोनाच्या प्रादुर्भावामुळे भांबावलेली परिस्थिती आता बदलायला हवी. यासाठी नागरिकांना आत्मिक शांती व समुपदेशनाची फार गरज आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन राज्यातील मंदिरे पुन्हा उघडण्यास परवांगी द्यावी. यासाठी कडक नियमावली करावी, जेणेकरून मंदिरांच्या माध्यमातून करोणाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, अशी मागणी पंडित दीनदयाळ परिवाराच्या वतीने वसंत लोढा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यापुढील काळात आपल्याला करोना बरोबरच जगायचे आहे. यासाठी स्वयंशिस्त पाळणे ही काळाची गरज आहे. मंदिरे सुरु करण्यास शासनाने परवांगी देऊन मंदिरात सामाजिक अंतर व हायजीन बाबतचे सर्व कडक नियम पाळण्याची जवाबदारी मंदिराच्या पुजाऱ्यांवर सोपवली तर ते जवाबदारी पार पाडतील.