मुंबई – केंद्र सरकारने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचे कायद्याने संरक्षण द्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे पण मोदींचे सरकार या विषयावरील चर्चाच टाळत असून ते यातून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे.
मुंबईत आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचयतीसाठी ते मुंबईत आले आहेत.
टिकैत म्हणाले की मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एमएसपीसाठी कायदा करण्याची मागणी त्यावेळी केंद्र सरकारकडे केली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी संपुर्ण देशभर हा कायदा झाला पाहिजे अशी त्यावेळी त्यांची भूमिका होती, पण आता मात्र ते यातून पळ काढीत आहेत असे ते म्हणाले. शेतकरी आणि शेतमजुरांच्या अनेक मागण्यासाठी शेतकरी नेते संपुर्ण देशभर जाऊन जनजागृती करतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.