मुंबई : राज्यात बऱ्याच ठिकाणी पुरपरिस्थिती कायम असून यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. कारण एकीकडे सरकार मदत करत असल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे विरोधक सरकारच्या मदतीला तुटपुंजी मदत असल्याचे सांगत आहे. त्यातच आता कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही शहरांना आणि आसपास गावात पुराने थैमान घातले आहे. सरकारने मात्र असंवेदनशीलतेचा कहर केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या सरकारला वेड लागले असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करुन जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
येड लागले आहे सरकारला
शुंन्य प्रघलबता#सांगली #कोल्हापूर #पुराचावेढा #सरकार pic.twitter.com/CGTZCDYO5D— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 10, 2019
भाकरी मिळत नसेल तर पाव खा म्हणणाऱ्या राणीशीच या सरकारची तुलना केली पाहिजे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. दोन दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मदत दिली जाईल. हा कसला आदेश आहे? असा आदेश काढताना लाज वाटत नाही का? राज्यावर संकट आलं तेव्हा शिवाजी महाराजांनी खजिना रिता केला होता. तशी दानत या सरकारने का दाखवली नाही असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.