सामनातून शिवसेनेची भाजपवर टीका
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने गुरूवारी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. दरम्यान, याच टीकेचा समाचार शिवसेनेने सामनामधून घेतला आहे. नवे सरकार शंभर तासही चालणार नाही असे दावे जे ऐंशी तासवाले करीत होते, त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने शंभर दिवसांत बरेच काही करून आणि घडवून दाखवले. जनतेच्या मनात जी अविश्वासाची किरणे होती त्यांचे रूपांतर विश्वासाच्या किरणांत करण्याची किमया ठाकरे सरकारने शंभर दिवसांत केली, असे म्हणत शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला आहे.
काही सरकारे फक्त दिवस ढकलतात किंवा मोजत बसतात. पंधरा दिवसांचा टप्पा पार केला तरी जाहिरातरूपाने उत्सव साजरा करतात. अशा जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसांत महाराष्ट्रात फाटलेच आहेत. त्या मुखवटेबाजांची होळी झाली आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने रामराज्य सुरू झाले त्यास शंभर दिवस झाले. हे सरकार शंभर तासही चालणार नाही असे दावे जे ऐंशी तासवाले करीत होते, त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने शंभर दिवसांत बरेच काही करून आणि घडवून दाखवले. जनतेच्या मनात जी अविश्वासाची किरणे होती त्यांचे रूपांतर विश्वासाच्या किरणांत करण्याची किमया ठाकरे सरकारने शंभर दिवसांत केली, असेही सामनातून म्हटले गेले आहे.
काही सरकारे फक्त दिवस ढकलतात किंवा मोजत बसतात. पंधरा दिवसांचा टप्पा पार केला तरी जाहिरातरूपाने उत्सव साजरा करतात. अशा जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसांत महाराष्ट्रात फाटलेच आहेत. सरकार कोणाच्याही पाठिंब्याने चालत असले तरी उद्धव ठाकरे व शिवसेना आतून-बाहेरून जशी होती तशीच आहे. विचार आणि भूमिकेत कोणतेही बदल झाले नसल्याचे सामनात सांगण्यात आले.