नवी दिल्ली : चिनमधील वुहान येथून पसरत चाललेल्या कोरोना विषाणूंच्या साथीच्या पार्श्वभूमीवर चिनमधून कोणतही प्रवासी आणण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्याचबरोबर जारी केलेले सर्व व्हिसा तातडीने रद्द करण्यात आले आहेत.
चीनमध्ये मंगळवारी मृतांची संख्या 425 वर पोहोचली तर 20 हजार जणांना बाधा झाली आहे. चीनहून परतलेल्या तीन जणांना कोरोना न्यमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गृहमंत्रालयाच्या ब्यरो ऑफ इमिग्रेशनने याबाबात एक पत्र मंगळवारी प्रसिद्ध केले. त्यानुसार, चीनमधूमन कोणत्याही प्रवाशाला कोणत्याही विमान कंपनीने बसू देऊ नये. चीनी अथवा परदेशी कोणत्याही व्यक्तीकडे वैध व्हिसा असेल तरी त्याला विमानत भारतात कोठेही जाण्यासाठी प्रवेश देऊ नये. या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी. पुढील सुचना येईपर्यंत हा आदेश लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याचे व्हिसा यापुढे वैध नसतील, असे सांगून धारकांनी चीनशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तसेच 15 जानेवारीनंतर चीनमधून भाततात आलेल्यांनी भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हॉटलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. चीनमधूनम 650 भारतीयांना परत आणल्याच्या दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना 14 दिवसांसाठी विलगता कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे.
भारतीय नागरीकांना आणल्यानंतर चीनमध्ये जारी करण्यात आलेले सर्व इ व्हीसा बिजिंगमधील भारतीय दुतावासाने रद्द केले आहेत. मात्र चीनमध्ये असणाऱ्या भारतीय प्रवाशांनी दुतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. . मात्र काही कारणाने भारताला भेट देणे आवश्यक असेल तर बिजिंग येतील दुतावास आणि शांघाय तसेच गुआंगहाऊ येथील केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.