पुणे (प्रभात वृत्तसेवा) – धानोरी येथील गोकुळनगर परिसरात अंडरग्राऊंड वीजेची केबल तुटल्यामुळे दिवसभर वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
धानोरी भागात विविध ठिकाणी सतत वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना सतत वाढत आहेत. वीजपुरवठा गायब होत असल्याबाबत नागरिकांनी महावितरणकडे तक्रारीही नोंदविल्या. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
वीज नसल्याने पाणीपुरवठाही सुरळीत होऊ शकला नाही. जमिनीखालील केबल तुटल्यामुळे हे काम करण्यात अडचणी येत आहेत. उद्या सकाळी यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतरच वीज पुरवठा पूर्ववत होईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.