नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शना खाली शानदार कामगिरी केली आणि 300 जागांचा टप्पा पार केला.
दरम्यान, आज (गुरुवार) भाजप अध्यक्ष अमित शहा यांची पक्षाच्या राष्ट्रीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडली आहे. ‘अजून तरी ध्येया पर्यंत पोचणे बाकी आहे’ असे यावेळी अमित शहा म्हणाले. केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये भाजपची सत्ता स्थापन करणे हेच आमचे पुढील ध्येय आहे. या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आले तर, पक्ष आणखी उंचावर जाईल अशी भावना अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केली.