बारामती (प्रतिनिधी) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन करण्यात आलेले 14 दिवसांचे जनता कर्फ्यू सोमवारपासून उठवण्याचा निर्णय अधिकारी व व्यापारी यांच्या समन्वयाने घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून बारामती सुरू होणार आहे.बारामती नियमित सुरू झाली असली तरी शासकीय नियम व अटी लागू असणार आहेत.
बारामती मधील लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय आज उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घेतला आहे. बारामती मधील दुकानांची वेळ सोमवार पासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल. सर्वांनी मास्क वापरणे अनिवार्य असून सॅनीटायझर वापर करणे अनिवार्य आहे. जिम, हॉटेल, शाळा, पानपट्टी बंद असतील.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, नगर अध्यक्ष पौर्णिमा तावरे ,मुख्याधिकारी किरणराज यादव ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, तालुका आरोगयाधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी यावेळी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी जनता कर्फ्यूची उपाययोजना करण्यात आली होती. या काळात काही वेळेस रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर काही वेळेस रुग्ण संख्या घटली.