हैदराबाद – केंद्र व राज्यांनी एकत्रित वित्तीय तूट 6 टक्क्यांच्या आत रोखण्याचे ठरवले असले तरी ही एकत्रित तूट 14 टक्क्यांपर्यंत वाढू शकते असा इशारा रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांनी दिला आहे.
जर केंद्र सरकारने आणखी कर्ज घ्यायचे ठरविले तर ही तूट 14 टक्क्यापेक्षा जास्त होऊ शकते. सध्याच्या परिस्थिीतीत विकासदरही वाढण्याची गरज आहे. त्यामुळे संतुलीत निर्णय घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.