नवी दिल्ली : सद्यस्थितीत कोणत्याही कामासाठी अत्यंत आवश्यक असणारे कागदपत्र म्हणजे ‘आधार कार्ड’. भारतातील ९० टक्क्यांहून अधिक लोकांकडे स्वतःचे आधार कार्ड आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की देशात पहिले आधार कार्ड कोणाचे बनले होते? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
आधार कार्डचे कामकाज यूपीए सरकारच्या काळात लागू करण्यात आले. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी आधार प्रकल्पाचे नेतृत्व केले. आधार कार्डच्या आगमनाने भारतात अनेक गंभीर बदल घडून आले आहेत. आधार हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा आहे. त्याच्या आगमनाने देशात पारदर्शकता दिसून आली आणि अनेक सरकारी कामांमध्येही सुधारणा झाली. विविध सरकारी योजना, बँकिंगशी संबंधित काम, नोकऱ्या इत्यादींमध्ये आपल्याला आधार कार्डाची विशेष गरज आहे. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात लोक आधार कार्ड बनवत आहेत. चला तर, जाणून घेऊयात, भारतात पहिले आधार कार्ड कोणाचे बनले होते याबद्दल.
जानेवारी 2009 मध्ये, भारत सरकारने युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना केली. या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर सप्टेंबर 2010 पासून आधार कार्ड बनविण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर भारतातील लोकांचे आधार कार्ड बनवून त्यांना मोठ्या प्रमाणात वितरित केले जाऊ लागले.
जर आपण भारतातील पहिल्या आधार कार्डबद्दल बोललो, तर देशातील पहिले आधार कार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी रंजना सोनवणे यांचे बनले होते. रंजना या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तांबळी येथील रहिवासी आहेत.
यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्रातील नंदुबार जिल्ह्यातील तांबळी गावातून आधार कार्ड बनवण्याची सुरुवात झाली. भारतातील पहिले आधार कार्ड सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत रंजना सोनवणे यांना देण्यात आले.
भारतातील पहिले आधार कार्ड मिळविणाऱ्या रंजना सोनवणे या पहिल्या महिला ठरल्या. आज भारतात मोठ्या संख्येने लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या सर्वांना याची गरज आहे.