पुणे – राज्यातील गाळप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत तब्बल 194.03 लाख क्विटल साखर निर्मित झाली आहे. राज्यात सध्या 139 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यात 74 सहकारी व 65 खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
सध्या कोल्हापूर विभागातील सर्वाधिक म्हणजे 33 कारखाने सुरू आहेत. त्याखालोखाल पुणे विभागात 29 कारखाने सुरू आहेत. फक्त दोन कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. राज्यात आतापर्यंत 190.82 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून 194.03 साखर उत्पादन झाली आहे. सर्वाधिक साखरेचे उत्पादन हे कोल्हापूर विभागातून झाले असून आतापर्यंत 71.08 लाख क्विटल साखर उत्पादित झाली आहे. त्याचबरोबर सर्वाधिक उतारा हा सुद्धा 11.21 टक्के कोल्हापूर विभागातील उसाला मिळाला आहे.