मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
याच टप्पूसेनेतील मुख्य कलाकार ‘भव्य गांधी’ याच्या वडिलांचे म्हणजेच, ‘विनोद गांधी’ यांचे करोनामुळे निधन झाले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार भव्यच्या वडिलांनी 11 मे रोजी मुंंबईमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
View this post on Instagram
विनोद गांधी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत ‘भव्य गांधी’ याची टप्पू ही भूमिका विशेष गाजली. प्रेक्षकांनी देखील त्याचे भरभरून कौतुक केलं आहे. मालिकेत भव्यने तब्बल 8 वर्ष टप्पू हे पात्र साकारल्यानंतर 2018 मध्ये त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
भव्यला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. मालिकेतून निरोप घेतल्यानंतर भव्यने काही गुजराती चित्रपटांमध्ये काम केले.