जम्मू : कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. फुलांची विक्री न झाल्याने जम्मू येथील शेतकऱ्याने थेट फुल शेतीवर नांगर फिरवला आहे. कोरोना विषाणूने जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना जवळपास ७० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. जम्मूत २ हजार हेकटरमध्ये वेगवेगळ्या पुलांची शेती केली जाते.
अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन झेंडू, ग्लॅडियस, गुलाब इत्यादी फुलांची लागवड केली होती. पण अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या घातक विषाणूमुळे आतापर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे तर, जगभरात या विषाणूचे २० लाखपेक्षा अधिक रुग्ण आहेत. जगभरात आतापर्यंत या विषाणूपासून ४ लाख ८६ हजार जण बरे झाले आहेत.
तर दुसरीकडे अमेरिकेनं डब्ल्यूएचओचा आर्थिक निधी बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने निधी थांबवल्याप्रकरणी ‘चीन’ने चिंता व्यक्त केली आहे. मागील २४ तासात अमेरिकेत २ हजार २२८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.