शेत जमीन पेटवणे पडले महाग; 800 जणांवर गुन्हे दाखल, आंदोलनाची शक्यता
नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदुषणाची पातळी कमालीची वाढल्यानंतर उत्तर प्रदेशात शेतजमीन पेटवण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी याबाबत मोठी कारवाई सुरू केली असून एका दिवसांत 29 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. तर 800 पेक्षा अधीक जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. त्यांच्यावर सुमारे आठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.या कारवाईला मोठा विरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मथुरेतून हाती आलेल्या वृत्तनुसार, शेतजमीन पेटवणाऱ्या 300 शेतकऱ्यांकडून 13 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मथुरेचे जिल्हाधिकारी सर्वग्य राम मिश्रा म्हणाले, पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 15 चे उल्लंघन केल्या प्रकरणी शेतकऱ्यांना अटक करण्यात येईल. अशा प्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
या शेतकऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 278 (वातावरण हानीकारक बनवणे), कलम 353 ( सरकारी कर्मचाऱ्यावर हल्लका करणे किांवा त्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे), गुन्हे प्रक्रिया संहितेचे कलम 151 ( दखलपात्र गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी अटक)नुसार शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काही ठिकाणच्या सरपंचांना मोठ्या प्रमाणात शेत जमीनी पेटवून देण्याच्या घटना घडक्याने नोटीस बजावण्यात आली आहे.
जमीन पेटवण्याच्या सुमारे 2 हजार घटना आढळून आल्या आहेत. त्यात मथुरेत 455 तर पिलभीतमधील 321 घटनांचा समावेश आहे.