भवानीनगर – बीकेबीएन रस्त्यावरील सोनगाव ते तावशी रोड खराब झाल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे वाहनचालक कमालीचे संतप्त झाले आहेत.
दोन वर्षे सोनगाव ते तावशी रोड हा खराब आहे. या मार्गावर जांब गावापर्यंत मोठे खड्डे पडले आहेत. खड्डयात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे हे खड्डे मोठे होऊन वाहनचालकांना अडचणी निर्माण होत आहेत. बारामती-कळंब- बावडा- नरसिंहपूर रस्त्यावर सोनगाव ते तावशी व जांब भागात रस्ता कायम खराब आहे. त्यामुळे वाहनांचे देखील नुकसान होत आहे.
याकडे प्रशासन कायमस्वरूपी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना न्याय मिळत नाही. परिसरातील गावातील नागरिकांना रस्त्याबाबत कायम तक्रार करावी लागत आहे. परंतु याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. बारामती ते नीरा नरसिंहपूर या ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. प्रशासनाने हा रस्ता लवकर दुरुस्त करून ग्रामस्थांची रस्त्याची सोय करावी, अशी मागणी वाहनचालक व परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.