नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत वाहतुकीसाठी पुन्हा एकदा ऑड-इवन नियम लागू करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. दरम्यान, केजरीवाल सरकारच्या या निर्णयावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. दिल्लीतील सम-विषम फॉर्म्युला ही केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.
दिल्लीत केजरीवाल सरकार प्रदुषण नियंत्रणासाठी 4 ते 15 नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीसाठी नवा नियम लागू करणार आहे. हा निर्णय प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने घेतला आहे. या काळात दिल्लीतील जनतेला सरकारकडून प्रदुषणापासून बचावासाठी मास्क देखील वाटण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारच्या यासर्व भूमिकेवरच मनोज तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रदुषणापासून बचावासाठी दिल्ली सरकार मास्कचे वाटप करणार आहे परंतू, हे मास्क वाटप आताच का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपकडून पाचही वर्षामध्ये मास्करचे वाटप करण्यात येते परंतू, केजरीवाल सरकार आगामी निवडणुकांचा विचार करून ही स्टंटबाजी करत असल्याचाही आरोप यावेळी तिवारी यांनी केला.