जेरूसलेम – पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल यांच्यात गेली अनेक वर्षे जो संघर्ष सुरू आहे त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न संयुक्तराष्ट्रांनी हाती घेतले असून त्यासाठी त्यांनी अन्य देशांचीही मदत घ्यायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय नेत्यांशी या संबंधात चर्चा करण्यासाठी संयुक्तराष्ट्रांचे एक शिष्टमंडळ सोमवारीच भारतात येणार आहे.
भारताचे पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. या दोन्ही देशांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेऊन ते एकमेकांशी शांततेने राहावेत अशी भारताची जूनी भूमिका आहे.
त्यातूनच भारताच्या मदतीने या प्रश्नावर तोडगा काढण्याचाही प्रयत्न हे शिष्टमंडळ करणार आहे. सोमवार पासून हे शिष्टमंडळ भारताच्या दोन दिवसांच्या भेटीवर येत असून ते विदेश मंत्री एस जयशंकर आणि अन्य भारतीय थिंक टॅंक नेत्यांशी चर्चा करणार आहेत.