नवी दिल्ली – राजकारणात तरुण लोकांची गरज असल्याचे मत इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. जर कोणी मला सरकारमध्ये येण्यास सांगत असेल तर मी ते स्वीकारणार नाही, मला वैयक्तिकरित्या विश्वास आहे की राजकारणात तरुण लोकांची गरज असल्याचे सांगत माझे राजकारणातील दिवस संपले असल्याचे सॅम पित्रोदा म्हणाले. पुढे बोलताना सॅम पित्रोदा यांनी कधीकधी लोकांना राजकारणातून जाणे कठीण होते असे म्हंटले आहे.
Sam Pitroda, Indian Overseas Congress Chief: I personally believe we need younger people in politics. People like us should back off. If someone asks me to be in the govt, I will not accept it. My days are over. And it's tough sometimes for people to let go. pic.twitter.com/bXGM1MCrto
— ANI (@ANI) April 6, 2019
वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नेत्यांना निवडणूक रिंगणात न उतरवण्याचे धोरण भारतीय जनता पक्षाने या लोकसभा निवडणुकीत अवलंबले आहे. भाजपच्या या निर्णयामुळे लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दिग्गजांनाही उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील निवडणूक न लढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी देखील राजकारणात तरुण लोकांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे राजकीय विरोधक असलेल्या या दोन पक्षांमध्ये राजकारणातील तरुणांच्या सहभागाबद्दल एकमत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.