वडगाव मावळ – मागील अनेक वर्षांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या कुरवंडे येथील धनगर वस्तीवर देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे अखेर वीज पोहचली अन् वस्तीवरील अंधार दूर झाला.
मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील धनगर वस्तीवर अद्याप वीज पोहोचली नव्हती. आधुनिक काळात देखील येथील नागरिक अंधारातच राहत होते. विद्युत पुरवठ्याअभावी तंत्रज्ञानाच्या युगातही या वस्तीवर वास्तव्यास असणारे नागरिक टेलिव्हिजन व इतर अत्याधुनिक तांत्रिक साधनापसून वंचित होते. येथील लोकवस्तीवरील वीज पोहोचविण्यासाठी आमदार शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, दीपक हुलावळे, महावितरणचे अभियंता विष्णू पवार, सरपंच अनिता कडू, उपसरपंच सुप्रिया पडवळ, जयश्री कडू, सखाराम कडू, विशाल कडू, नारायण कडू, सुनील ढोरे, बाळासाहेब भानुसघरे, संतोष राऊत, अमोल केदारी, बाबा मुलाणी, सुरेश कडू, संदीप आंद्रे, गणेश थिटे, संजय बाविस्कर, अनिल मालपोटे, सागर बोडके, अजिंक्य टिळे, गोरख हिंगे, दिनेश गायकवाड, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.