मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण राज्य स्तब्ध आहे. त्यात दररोज रुग्नांच्या संख्येत वाढ होत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्य सरकार विविध उपाय योजना करीत असले तरी राज्यातील आत्ताची स्थिती काळजी वाढवणारी असल्याचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र जास्त भरडले जाण्याची शक्यता आहे. राज्यसरकारने सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती नेमण्याची मागणी देखील विखे पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
विखे पाटील यांनी, राज्यातील अनुभवी सर्वपक्षीय नेत्यांची उच्चाधिकार समीती नेमावी व संकटावर मात करण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज असल्याच मत व्यक्त केले. यासंदर्भात भाजप पक्ष नेतृत्वाला सुद्धा पत्र लिहिले असून सर्व पक्षीय नेत्या सॊबत विविध क्षेत्रातील तज्ञांचा सुद्धा समावेश समितीत करावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.