मुंबई – पेगॅससच्या माध्यमातून देशातील विरोधी पक्षाचे नेते, न्यायाधीश, पत्रकार, मंत्री अशा अनेकांची हेरगिरी करण्यात आली. अशारितीने स्नुपिंग होत असेल तर हे देशाची लोकशाही धोक्यात असल्याचे लक्षण आहे. अशी संस्थांची माहिती गोळा करून त्यांच्यावर दबाव निर्माण करणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
पेगॅसस स्पायवेअर केंद्र सरकारने खरेदी केले होते का याबाबत सरकारने खुलासा करावा, असेही मलिक म्हणाले. जर त्यांनी हे केले नसेल तर बाहेरील देशाकडून हे करण्यात येत आहे का? असे असल्यास हे गंभीर असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
संसदेत याविषयाची चर्चा करण्याची मागणी असताना सरकार यावर चर्चा करत नाही. यातून काहीतरी लपवण्याची गोष्ट होत आहे, पळवाट काढण्याची भूमिका केंद्र सरकार करत आहे अशी, टीका मलिक यांनी केली आहे.