हिंगोली प्रतिनिधी (शिवशंकर निरगुडे) – राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हें भाजपामध्ये जाणार अशा चर्चांना गेल्या अनेक दिवसा पासून उधाण आले होते. यावर अशोक चव्हाण यांनी देखिल स्पष्टीकरण दिले असले तरी रोज नव्या कुठल्या तरी भाजप नेत्याचा हवाला देऊन अशोक चव्हाण कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार अशा बातम्या येतात. मात्र या संदर्भात कॉंग्रेसचे नेते व माजी प्रदेशअध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हिंगोलीत अशोक चव्हाण हें कॉग्रेस सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे
हिंगोली येथील शासकीय विश्रामग्रहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या वेळी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष दिलीप देसाई व भाऊ यांच्यासह कॉंग्रेसचे जेष्ठ नेते देखिल उपस्थितीत होते हिंगोली येथील कॉंग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीला कॉंग्रेसचे दोन्ही गट एकत्र पाहायला मिळाले. राजीव सातव गट व भाऊ पाटील गोरेगावकर यांचे गट यावेळी एकत्र दिसून आले.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाली की भाजपच्या धोरणामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील नागरिकांची आपसात मन तुटलेली असून त्यासाठी भाजपाच जबाबदार आहे. देशात त्यापेक्षाही अस्तिर वातावरण निर्माण करायचे प्रयत्न भाजपाकडून होत असून त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढली जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेची मने जोडण्याचा प्रयत्न आहे. काही जण या यात्रेला काँग्रेस जोडो यात्रा म्हणुन संबोधत आहेत. मात्र विरोधकांनी सुरू केलेला हा अपप्रचार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातून १५ दिवस ही यात्रा जाणार आहे सध्या जळगाव जामोद व नांदेड येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभाचे आयोजक करण्यात आले आहे. यामध्ये आणखी काही सभांची वाढ होऊ शकते या यात्रेमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून यात्रा आपल्या जिल्ह्यात कधी येणार याची उत्सुकता पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लागली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या अफवा असून विरोधकांकडून या अफवा पसरविल्या जात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने त्यांना भरभरून दिले आहे त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत असंही ठाकरे यावेळी म्हणाले.