राष्ट्रपतींनी दिली विधेयकाला मान्यता
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर तिहेरी तलाक विधेयकाला मंजूरी दिली आहे. राष्ट्रपतींनी बुधवारी रात्री उशीरा तिहेरी तलाक विधेयकावर स्वाक्षरी केल्याने हा कायदा आता देशात लागू झाला आहे. दरम्यान, त्यांच्या स्वाक्षरीनंतर देशात लागू झालेला कायदा हा 19 सप्टेंबर 2018 पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मंगळवारी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर मुस्लीम महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या कायद्यानुसार आता तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीस 3 वर्षाची तुरूंगवास आणि दंड अशी शिक्षा देण्यात येणार आहे. दोन दिवसापुर्वी लोकसभे नंतर राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 99 मते आणि विरोधात 84 मते पडल्याने अखेर हे बिल राज्यसभेत समंत झाले. बीएसपी, पीडीपी, टीआरएस, जेडीयू, एआयएडीएमके आणि टीडीपी या पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सरकारला हे विधेयक समंत करुन घेण्यासाठी सोपे झाले. राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्याने या कायद्याने 21 फेब्रुवारीला जारी केलेल्या अध्यादेशाची जागा घेतली आहे.