बंगळुरू – कर्नाटकचे गृहमंत्री एम. बी पाटील यांनी सिद्धरामैया हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी जाहीर इच्छा व्यक्त केल्याना कर्नाटकातील कॉंग्रेस जेडीएस आघाडीत काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपले वक्तव्य सुधारून घेताना पाटील यांनी म्हटले आहे की, ते आमचे नेते आहेत पुढील निवडणुकीत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे अशी जर मी इच्छा व्यक्त केली तर त्यात काय चुकले? सध्या कुमारस्वामी हेच मुख्यमंत्री आहेत आणि ते त्यांचे सरकार पाच वर्षांची टर्म पुर्ण करेल अशी दुरूस्तीही त्यांनी आपल्या वक्तव्यात केली.
कर्नाटकचे चिक्कबल्लापुरचे कॉंग्रेसचे आमदार के सुधाकर यांनीही सोमवारी सिद्धरामैय्या हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले तर बरे होईल असे विधान केले होते. त्या पाठोपाठ गृहमंत्र्यांनीहीं हे विधान केल्यामुळे राज्यातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.