10 हजारांऐवजी 20 हजार रुपये अनुदान मिळणार
नगर (प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रात सामूहिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या बरोबर इतर इतर मागासवर्गीयांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जोडप्यांना 20 हजाराचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. परंतु यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात किमान दहा जोडपे विवाहबद्ध होण्याची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे कन्यादान योजनेला बाधा निर्माण होण्याची शक्यता सेवाभावी संस्थांकडून केली जात आहे.
विवाह सोहळ्यामध्ये होणारा अनाठायी खर्च व त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होण्याची वेळ येते. आणि त्या सामान्य माणूस समस्यांच्या खाईत लोटल्या जातो. हे प्रकार टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत इतर मागासवर्गीय यांचा समावेश करण्यात आला आहे. या जोडप्यांना शासनाकडून 20 हजार रुपयांचे अनुदान दिल्या जाणार आहे. तसेच विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सुद्धा चार हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांना पूर्वी वस्तू रुपात देण्यात येत होते. ते आता रोख स्वरूपात अनुदान दिल्या जात आहे. सदर रकमेचा धनादेश विवाह सोहळा विवाहाच्या दिवशी देणे बंधनकारक आहे.
अनुदान मिळण्यासाठी निकष
सामूहिक विवाह सोहळ्यात करिता किमान दहा जोडपी असणे आवश्यक आहे. विवाह सोहळा आयोजित करणारी संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात केलेली असावी. ग्रामीण भागातील दांपत्याचे खातरजमा करण्यासाठी सरपंच, पोलिस पाटील अथवा ग्रामसेवक तसेच शहरी दाम्पत्यासाठी नगरसेवक व मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. दाम्पत्याची जात प्रमाणपत्र पडताळणी संबंधित कार्यालयाकडून करणे आवश्यक आहे.