नगर -करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले असतानाही शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 6 ते 7 नागरिकांवर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रस्त्यावर उतरले आहे.
पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे शहरातील विविध भागातील रस्त्यांवर फिरत असताना पारशाहखुंट परिसरात 6 ते 7 नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने त्यांच्यासमवेत असलेल्या कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी त्या नागरिकांना ताब्यात घेतले आहे.