मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सुळे म्हणाल्या, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ साली सत्ता सोडली तेंव्हा राज्यावर १.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. पण ते आता वाढून ४.७१ लाख कोटी झालंय. याचाच अर्थ राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर किमान ४० हजार रुपयांचे कर्ज आहे.
युती सरकारनं राज्याला कर्जाच्या खाईत लोटलं. युती सरकारनं जेवढं कर्ज घेतलंय त्या प्रमाणात काहीही झालेलं दिसत नाही. मग हे कर्ज कशासाठी घेतलंय? असा प्रश खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.