पुणे – बाजार समिती आवारातील व्यवहार नियमनमुक्त करून सेसची आकारणी करू नये, देखभाल खर्च आकारू नये, या मागणीसाठी मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.
दरम्यान, बाजारात 37 गाड्या माल घेऊन आल्या होत्या. बाजार बंद असल्याने त्यातील माल उतरून घेण्यात आला नाही. त्यामुळे गाड्या तशाच उभ्या असल्याची माहिती भुसार विभाग प्रमुख नितीन रासकर यांनी दिली.
केंद्र सरकारने बाजार आवाराबहेरील व्यापार नियमन मुक्त केला आहे. बाजार आवारात मात्र सेस आणि देखभाल खर्च आकारला जात आहे. त्यामुळे बाजारातील वस्तुंच्या किंमती या बाहेरपेक्षा महाग असणार आहेत. मोठ-मोठ्या मल्टिनशनल कंपन्यांशी स्पर्धा असताना येथील महाग वस्तु नागरिक खरेदी करणार नाहीत. त्यामुळे येथील व्यापार अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी येथील व्यापार नियमनमुक्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.