मुंबई: विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर मुख्यमंत्री कोण हा कळीचा मुद्दा ठरला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आपसूकच सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती आल्या आहेत. त्यामुळे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद यावर शिवसेना अडून बसलेली आहे. तर मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझोता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे.
शिवसेनेकडून जरी सांगण्यात येत असले तरी अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद देऊ, असं कधीच कबूल केलं नव्हतं. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असं काहीही होणार नाही, सीएमपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असं भाजपाध्यक्ष अमित शहांनीही मला सांगितल् असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Maharashtra CM Devendra Fadnavis: BJP will be leading the stable and efficient government of Mahayuti (alliance) for 5 years. (file pic) pic.twitter.com/07QBFSUXOZ
— ANI (@ANI) October 29, 2019
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला शब्द दिलेला नव्हता. वाटाघाटीत अडीच वर्षांत मुख्यमंत्रिपदाचा शब्द नव्हता. आम्ही चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, कोणतीही आडमुठी भूमिका नाही. त्यांच्या मागण्या रास्त असल्यास विचार करू. आम्ही कुठलाच पर्याय शोधत नाहीत. शिवसेनाही शोधत नाही. निम्मं निम्मं काय ठरलं होतं ते पुढील दोन ते तीन दिवसांत कळणार असल्याचे सूचक विधान फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत येणार असल्याची माहिती समोर अली होती. परंतु शहा हे मुंबईला येणार नाहीत असे फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केलं आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत विधिमंडळाचा नेता कोण यावर शिक्कामोर्तब होईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री होणार असल ्याचं सांगितलं.