मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तिसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाली. पहिले दोन दिवस विरोधीपक्षाच्या नेत्यांनी गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मोर्चा हाती घेत विरोधकांच्या भाषणांना प्रत्युत्तर दिलं. त्यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर कडाडून टीका केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली त्या चर्चेला उत्तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र उद्धव ठाकरे संपूर्ण भाषणात महाराष्ट्रात येऊ शकले नाही. ते चीन,पाकिस्तान, अमेरिका, पंजाब, साऊथ, काश्मीरवर बोलले. मात्र ते महाराष्ट्राबद्दल बोलले नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मुख्यमंत्री आता नवीन नाही. त्यांना चौकतलं आणि संभागृहातल भाषण यातील फरक कळला नसल्याचे फडणवीस यांनी म्हटलं.
सभागृहात उपस्थित मुद्दांवर बोलावं लागतं. शेतकऱ्यांसंदर्भात मुख्यमंत्री बोलले नाही. दुर्दैवाने मुख्यमंत्री शेतकरी अनुदान, खोडकिडी, बोंडअळी, विमा आणि वीज तोडणीवर मुख्यमंत्री बोलले नाही. मात्र त्यांना चिंता दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांनी आज केलेलं भाषण अत्यंत सुमार असून महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं सुमार भाषण आजपर्यंत झालं नाही, अशी टीका फडणवीस यांनी लावला.