नवी दिल्ली – इराण मधील चाबहार बंदर भारत विकसित करीत आहे, ते बंदर सुरू झाल्यानंतर भारताचा काहीं देशांना केल्या जाणाऱ्या मालवाहतुकीचा किमान 20 टक्के खर्च वाचणार आहे असे
केंद्रीय मंत्री मनसुखलाल मंडाविया यांनी म्हटले आहे.
आर्मेनिया, अझरबैझान, बेलारूस, कझाकस्तान, किरगीजस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान अशा देशांना माल पुरवठा करण्यासाठी चीन किंवा युरोपातील मार्गाचा वापर करावा लागत होता. चाबहार बंदरांमुळे हे अंतर कमी होऊ शकणार आहे असे मंडाविया यांनी म्हटले आहे.
हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांताच्या जवळ आहे. इराणच्या दक्षिणेकडील तटावर ते आहे. ते पार्शियन आखाताच्या बाहेर असल्याने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून या बंदरात पोहचणे सोपे आहे, आणि
त्यासाठी पाकिस्तानला टाळून तेथे जाता येते. त्या बंदरावर माल चढवणे आणि उतरवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे असे मंडाविया यांनी म्हटले आहे.