सातारा – जावळी तालुक्यातील मेरुलिंग घाटात रविवारी सकाळी सात वाजून 45 मिनिटांच्या सुमारास इर्टीगा कार घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून पलटी झाली. यामध्ये इर्टीगा कार चालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय 40) यांच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
संदर्भात घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी,मेरुलिंग घाटामध्ये रेशनिंग आणण्यासाठी इर्टीगा कारमधून आठ जण निघाले होते. मेरुलिंग घाटात एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कार पलटी झाली.यामध्ये चालकासह तीन जण जागीच ठार झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
कार चालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय 40) लिलाबाई गणपत साबळे (वय 55) सागर सर्जेराव साबळे (वय 32) असे एकूण तीन मृत्युमुखी पडले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. अपघात झालेल्या बरोबरच स्थानिक घटनास्थळी नागरिकांनी जखमींना बाहेर काढले व तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मेढा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.