राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : देश आज आपला 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. त्यातच स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द झाल्याने तसेच राज्याचे विभाजन झाल्याने स्थानिक नागरिकांनाच मोठा लाभ होणार असून त्यांचा वेगाने विकास होईल, असे प्रतिपादन केले. तसेच देशवासियांना ज्या सोयीसुविधांचा लाभ होतो त्यांचा लाभ आता जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील जनतेलाही घेता येणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
President: Earlier this summer, people of India participated in the 17th general election, the largest democratic exercise in human history. For this I must congratulate our voters. They turned up at polling stations in large numbers & with much enthusiasm. #IndiaIndependenceDay pic.twitter.com/PAOHE5I92p
— ANI (@ANI) August 14, 2019
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी अनंत परिश्रम केले, लढे उभारले त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या केवळ राजकीय सत्तेचे हस्तांतरण, अशी संकुचित नव्हती. देश उभारणीच्या दीर्घ आणि व्यापक प्रक्रियेतील ते एक महत्त्वाचे पाऊल होते. त्यांचे खरे ध्येय हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा विकास आणि त्यायोगे समाजाचा विकास हेच होते. तोंडी तलाकविरोधातील कायद्यासारखे नवे कायदे हे त्याच हेतूने केले गेले आहेत, असेही कोविंद म्हणाले.