पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने चोरट्यांचे फावतेय, ग्रामस्थ हैराण
सणसवाडी -शिरूर तालुक्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरात बॅटऱ्या, डिझेल, मोबाईल इतकेच काय पण दिवसाढवळ्या मंदिरातील दानपेटी व घरफोड्या अशी चोऱ्यांची मालिका अखंडपणे सुरू आहे. गेल्या आठवड्यात रोज चोऱ्या लुटमाऱ्या होत असून पोलिसांना या तपासकामात वेळ व रस नसल्याने चोरांचे फावत आहे. 14 तारखेला रस्त्यावरील गाडीची बॅटरी गेली. वाहन बाहेरगावचे असल्याने त्याने गुमान नवी बॅटरी टाकून जाणे पसंत केले.
दि. 15 रोजी रात्री सुदर्शन ट्रान्सपोर्टची गाडी घरासमोर लावली असता चोरांनी लॉक तोडून बॅटरी लांबवली. सकाळी आठ वाचता पोलीस ठाण्यात फोन लावला असता पोलीस पाठवतो म्हटले, पण 11 वाजेपर्यंत कोणीही न आल्याने परत फोन लावता हां हां पाठवतो म्हणत कुणी आले नाही. त्यावर सायंकाळी 6 वाजता परत फोन केला असता महिला अधिकाऱ्याने सांगते म्हणून टाळले.
त्यावर पंचांसमक्ष फोटो काढून पोलीस ठाण्यात दुसऱ्या दिवशी तक्रार दिली. 17 तारखेस आडरस्त्याला अडवून एका कामगाराचा फोन व 700 रुपये काढून घेतले. याआधीच्या चोऱ्यांचा तपासच होत नाही हे समजल्याने त्याने तक्रार दिली नाही. दि. 18 ला तर कहरच झाला.
दुपारी 3 वाजता लाल शर्ट घातलेल्या एका चोरट्याने भैरवनाथ मंदिरातील दानपेटी उचलून शांतपणे स्वतःची सुटकेस घेऊन चाललाय असा मागच्या पायऱ्या उतरत लगेच रस्त्याला येत. रिक्षात बसून आरामात निघून गेला. त्याचे व रिक्षावाल्याचे संगनमत असावे की काय म्हणून दानपेटी हाती असलेली या चोरास बसवून तो रिक्षावाला लगेच सटकला असावा अशी चर्चा आहे. या चोरीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातीलदोन फुटेज पोलिसांना दिले व सर्वत्र व्हायरलही झाल्या.
दि. 19रोजी सलिम यांचच्या भंगार गोडाऊनमधून दोन गाड्यांचे डिझेल व एका गाडीची बॅटरी चोरांनी वायरी तोडून नेली. त्याची पोलिसास खबर देता पाहणी करून गेले. गाडीचे तिन्ही बाजूचे शेडमध्ये 25 कामगार झोपले होते. त्यातुनही चोरांनी हे धाडस केल्याने चोर फारच बेडर असावा, अशी बॅटऱ्या व डिझेलचोरांची टोळी काळ्या गाडीसह कार्यरत असलेचे जगजाहीर आहे.
पण ते पोलिसांना का सापडत नाहीत याचे आश्चर्य वाटते. मागे डिझेल चोरांचे व गाडीचे फुटेज पोलिसांना देऊनही शोध लावला नाही व सोकावून त्यांनी पुन्हा चोऱ्यांचा धडाका लावता पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नाही याचे सर्वच ठिकाणी चर्चाच चालू आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधला असता एपीआय वैरागकर यांचेकडे जबाबदारी दिल्याचे सांगितले. तरी हा चोरांचा सुळसुळाट थांबवावा अशी नागरीकांची मागणी आहे