मुंबई – मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीबाबत वृक्षप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला होता, अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड कामाला स्थगिती दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पालाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.
बुलेट ट्रेन ही मोदींची प्राथमिकता असू शकेल पण ती देशाची असू शकत नाही. pic.twitter.com/Hb2PuMBpfW
— Sachin Sawant (@sachin_inc) December 3, 2019
दरम्यान, मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन याच मुद्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. त्यांनी ट्विट द्वारे सांगितले की,’देशातील अनेक विमान कंपन्या ह्या नुकसानीत चालत आहे हवाई उद्योग अजूनही हवे तसे विकसित झाले नाही. तर मुंबई- अहमदाबादचा विचार केला तर तीन हजारपेक्षा अधिक भाडे नाहीत. त्यामुळे बुलेट ट्रेनचा १० ते ११ हजार रुपयांचा भाडे भरून कोण प्रवास करणार आहेत. तसेच बुलेट ट्रेनमधून नफा मिळण्यासाठी किती फेऱ्या लावावा लागतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलेट ट्रेनचा निर्णय फक्त गुजरातला मुंबईशी जोडण्यासाठी आहे. मुंबईमधील व्यापारी आणि उद्योगधंदे गुजरातकडे आकर्षित व्हावे या दृष्टीकोनातून त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता असून, बुलेट ट्रेन ही मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही. असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.