नवी दिल्ली – बिहारमधील गोपालगंज येथील २६४ कोटी रुपये खर्चून उभारलेला सत्तरघाट महासेतू पाण्याच्या दबावामुळे कोसळला. एक महिन्यापुर्वीच म्हणजेच १६ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पुलाचे उद्घाटन केले होते.
#WATCH: Portion of Sattarghat Bridge on Gandak River that was inaugurated by CM Nitish Kumar last month in Gopalganj collapsed yesterday, after water flow increased in the river due to heavy rainfall. #Bihar pic.twitter.com/cndClJHIAa
— ANI (@ANI) July 16, 2020
गोपालगंज येथील गंडक नदीवर सत्तरघाट महासेतू बांधण्यात आला होता. विविध जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा महत्त्वाचा पूल होता. मात्र, तीन लाखांपेक्षा अधिक क्यूसेकने पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाचा एप्रोच रोड तुटला. हा पूल कोसळल्याने चंपारण, तिरहुत आणि सारण येथील अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. हा कोसळलेला पूल पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली आहे.
Bihar: Portion of Sattarghat Bridge on Gandak River that was inaugurated by CM Nitish Kumar last month in Gopalganj collapsed yesterday, after water flow increased in the river due to heavy rainfall. pic.twitter.com/asjWBDZTJ8
— ANI (@ANI) July 16, 2020
दरम्यान, महासेतू कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी चौकशी करण्याची मागणी बिहार सरकारकडे केली आहे. यावरून तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर ट्विटरद्वारे निशाणा साधला.
263 करोड़ से 8 साल में बना लेकिन मात्र 29 दिन में ढ़ह गया पुल। संगठित भ्रष्टाचार के भीष्म पितामह नीतीश जी इस पर एक शब्द भी नहीं बोलेंगे और ना ही साइकिल से रेंज रोवर की सवारी कराने वाले भ्रष्टाचारी सहपाठी पथ निर्माण मंत्री को बर्खास्त करेंगे। बिहार में चारों तरफ लूट ही लूट मची है। pic.twitter.com/EIcQYPEHn8
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 16, 2020