जालना – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका नववधूने लग्नाच्या दिवशीच आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथील एका प्रेमीयुगुलानं रविवारी पहाटे एकाच दोरीनं गळफास आत्महत्या केली. ऐन लग्नाच्या दिवशी नववधूनं आपल्या प्रियकरासोबत आत्महत्या केल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचा आज दुपारी (16 मे) विवाह होणार होता. हळदी समारंभदेखील पार पडला होता.
दरम्यान आवडत्या व्यक्तीपासून वेगळं होण्याचं दुःख सहन न झाल्यानं या प्रेमीयुगुलांनी रविवारी पहाटे पाचच्या सुमारास पळून जाऊन आत्महत्या केली आहे. 18 वर्षीय स्नेहा राजू आव्हाड असं या मृत तरुणीचं नावं असून तिचं नवनाथ सुरेश गायकवाड (२१) याच्याशी प्रेमसंबंध होते. नवनाथचं मालखेडा रस्त्यावर पंक्चर काढून देण्याचा व्यावसाय होता.
स्नेहाचा अचानक विवाह ठरल्यानं काय करावं असा प्रश्न या प्रेमीयुगुलाला पडला होता. अखेरीस त्यांनी रविवारी पहाटे पाचच्या सुमारास एकाच दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे स्नेहा आणि नवनाथ हे दोघंही एकमेकांच्या नात्यात होते. तर स्नेहाचा आज दुपारी कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे याच्याशी विवाह होणार होता. त्याआधीच स्नेहा आणि नवनाथ यांनी मृत्यूला जवळ केलं.