कंगणाने बऱ्याच दिवसात कोणाशी पंगा घेतलेला नव्हता. मात्र, आता तिच्या तावडीमध्ये सैफ अली खान सापडला आहे. सैफ अली खानने अलीकडेच एक असे वक्तव्य केले होते, की त्यामुळे त्याच्यावर टीका व्हायला लागली. इंग्रज भारतात येण्याच्या आगोदर कदाचित “भारत’ नावाची काही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती, असे सैफने म्हटले होते. यावरून अनेकांनी सैफला टार्गेट करायला सुरुवात केली.
View this post on Instagram
कंगणा रणावत अशावेळी मागे कशी राहू शकेल. जर सैफच्या मतानुसार कोणताही भारत अस्तित्वातच नव्हता, तर मग महाभारत काय होते? असा प्रश्न कंगणाने विचारला आहे. वेद व्यासांनी काय लिहिले? महाभारतामध्ये श्रीकृष्णानेच सांगितले की भारत तेव्हाही अस्तित्वात होता.
पहिल्यांदा जरी राजे वेगवेगळे असतील, पण समान कारणासाठी ते एकत्र युद्धास तयार होत असत. त्यालाच भारत म्हटले जाते. “पंगा’च्या प्रमोशनच्यावेळी कंगणाने ही गोष्ट सांगितली. “पंगा’ 24 जानेवारीला रिलीज होतो आहे. अश्विनी अय्यर तिवारीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या “पंगा’मध्ये कंगणा एक कबड्डी खेळाडू म्हणून दिसणार आहे. यात रिचा चढ्ढा, जस्सी गिल आणि नीना गुप्ताही असणार आहेत.